भारतामधे केळी उत्पादन प्रामुख्याने होत असून त्यापैकी 25 टक्के वाटा महाराष्ट्राचा आहे. असे असूनही केळीची निर्यात नगण्य असून याला प्रामुख्याने अयोग्य सुगी पश्चात हाताळणी, वाहतुक व्यवस्था, साठवणुकीच्या अयोग्य सोयी इ. पध्दती कारणीभूत आहेत. यामुळे किमान 25 ते 40 टक्के मालाचे नुकसान होते. स्थानिक वाहतुक व वाहतुकीच्या सोयी यासुद्धा सुस्थापित झालेल्या नाहीत. या सर्व बाबींचा विचार करून दि. 1 जानेवारी, 2002 रोजी महाबनाना संस्थेची स्थापना करण्यात आली. केळी निर्यतीमध्ये सद्यस्थितीत खूप अडचणी आहेत. परंतू एकुण क्षेत्राचा व उत्पादनाचा विचार करता महाराष्ट्रातील केळींची निर्यात होणे खूप गरजेचे आहे. या गोष्टीचा प्राधान्याने विचार करुन कृषी पणन मंडळाने अपेडा, नवी दिल्ली यांचे मदतीने रावेर, जि. जळगाव येथे केळी निर्यात सविधा केंद्र उभारण्याचे ठरविले आहे. यात केळीसाठी प्रशीतकरण, शीतकरण, रायपनिंग चेंबर, व अत्याधुनिक हाताळणी यंत्र उभारणी यांचा समावेश आहे.
महाबनानाचे मुख्यालय जळगांव येथे असून संस्थेची ध्येय धोरणे पुढीलप्रमाणे आहेत.