महाराष्ट्रातुन ताजी फळे , भाजीपाला व फुलांचे जगभरात निर्यातीसाठी शेतकरी व शेतक-यांचे गट, कंपन्या, सहकारी संस्था यांचे सहकार्याने कृषि पणन मंडळाने निर्यातवृध्दीचे उपक्रम हाती घेतले आहेत. यामध्ये प्रामुख्याने पुढील उत्पादनांचा समावेश होतो उदा. द्राक्षे, आंबा, डाळींब, संत्रा, केळी, तांदुळ, आंबा पल्प, काजु, पॉलीहाऊसमध्ये उत्पादीत होणारे कट फ्लॉवर्स इ.
शेतकरी, शेतक-यांचे उत्पादक गट व कंपन्या यांना सातत्याने काढणीपुर्व उत्पादन तंत्रज्ञान व काढणीपश्चात हाताळणी तंत्रज्ञान, पॅकेजींग, प्रशितकरण, शितगृह व वाहतुक व्यवस्था याबाबततीतले नवनविन प्रशिक्षण दिले जाते. कृषि पणन मंडळाने निर्यात निकषांचे पालन करणेसाठी राज्यामध्ये विविध ठिकाणी एकुण 44 निर्यात सुविधा केंद्रांची निर्मिती केलेली असुन, अत्याधुनिक तंत्रज्ञाने युक्त असलेल्या व आंतरराष्ट्रीय निकषांन्वये प्रमाणीत असलेल्या व्हेपर हीट ट्रीटमेंट सुविधा, विकीरण सुविधा, मुंबई या विशेष सुविधांची उपलब्धता केलेली आहे. त्यामुळे देशांतर्गत व्यापार वाढ, निर्यात वृध्दी व रोजगार निर्मीतीत वाढ होत आहे. यासुविधांचा लाभ शेतकरी, शेतक-यांचे उत्पादक गट , शेतकरी उत्पादक कंपन्या, निर्यातदार इ. घेऊ शकतात. परदेशी बाजार पेठा काबीज करणेचे हेतुने कृषि पणन मंडळाने विविध देशांना प्रायोगीक तत्वावर निर्यातीचे उपक्रम अपेडा, नवि दिल्ली यांचे सहकार्याने पार पाडले आहेत.