कायद्यातील कलम ३७ (२) मधील तरतूदीनुसार राज्यातील प्रत्येक बाजार समितीस, कृषि पणन मंडळाकडे वार्षिक अंशदान जमा करावे लागते. राज्य शासनाकडील जा.क्र. अेपीएम/१०८५/६५६८/६२१/११-सी दि.४/४/१९८८ चे अधिसुचनेनुसार बाजार समित्यांच्या उत्पन्नानुसार खालील प्रमाणे अंशदानाचे दर निश्चित केलेले आहेत.
कायद्यातील कलम ३७ (२) मधील तरतूदीनुसार प्रत्येक बाजार समितीस आर्थिक वर्ष संपल्यानंतर २ महिन्यांचे आत आपली आर्थिक पत्रके कृषि पणन मंडळाकडे अंशदान आकारणीसाठी सादर करावी लागतात.
सन २०२२-२३ चे उत्पन्नानुसार एकूण ३०६ बाजार समित्यांपैकी २४२ बाजार समित्यांची अंशदान आकारणी मंजूर झालेली असून वरीलप्रमाणे विहीत केलेल्या टक्केवारीनुसार एकूण रु.३६.९३ कोटी अंशदान आकारणी करण्यात आली आहे.